एकदा एक वेडा जीव द्यावयास निघाला,
कंटाळला होता तो, पाशाला, दु:खाला, नि संकटना
तलावाजवळ जावून विचार करू लागला,
दु:ख का फक्त माझयाच नशिबाला?
..
जगण्याची उम्मेद नाहीशी झालेली,
इतक्यात दिसली एक आकृती झळ|ळलेली..
जवळ येऊन आकृती म्हणाली,
अरे वेड्या मी याच खेळातली एक बाहुली..
..
त्याने आकृती हा यक्ष जाणला..
..
पुढे येऊन यक्ष म्हणाला
इतका भेदरट का मानव निघाला
सॅंकताना तोंड द्यायला आत्मविश्वास का कमी पडला?
मानव संकताला घडवत नाही, संकताने मानव घडतो,
सर्वांपुढे जाण्याच्या स्पर्धेत काळच मागे पडतो..
संकताना तोंड दे, जगण्याची उम्मेद वाढव,
काळला तुझी गरज आहे, हे सर्वांना दाखव..
..
अंगावर स्फुरण घेऊन तो वेडा उठला,
जगायचे कसे हे आज तो शिकला..
काही दिवसांनी त्याचे नाव सर्व जगाने एकले,
नावात काय आहे असे त्याने म्हटले..
हजारो एकर शेताखालील जमिनीच्या कोणत्यातरी एका भागात
एक ऊसाचे रोपटे जन्माला येते..
ते एकटे नसते, त्याच्या बरोबर लाखो रोपटे जन्म घेतात..
आणि मग सुरू होते स्पर्धा, कोण जगतो याची.
प्रत्येकाला वाढायचे असते, सूर्यप्रकाशासाठी, जागेसाठी..
..
पण त्या जागेपासून थोड्या अंतरावर, बांधावर जन्मलेले
एक रोपटे, लांबून त्यांची गंमत पाहत असते.
ते त्यांच्या स्पर्धेत सहभागी होत नाही,
त्याला त्याची गरजच वाटत नाही.
ते फक्त त्यांना बघते उंच वाढतांना.
ते स्वत:लाच विचारते,
काय गरज असते अशी स्पर्धा करण्याची?
का इतरांपेक्षा मोठे वाढायचे?
..
इतर रोपटाना नियमीत पाणी मिळत असे.
हे रोपटे मात्र कधीकाळी मिळणारे
पाण्याचे थेंब शोषत असे..
..
आणि एक दिवस कापणी सुरू झाली,
सर्व रोपटाना कापले गेले.
जे उंच होते त्याना आनंदाने, इतरांना रागाने..
ते रोपटे स्वत:शीच हसले, आणि त्याच्यावर घाव बसला..
तेही रोपटे मेले, ..पण हसत.....:)